Posts

मनाचं संरक्षण – कोणते विचार स्वीकारायचे आणि कोणते टाळायचे?

#mindset – भाग 21 विषय: मनाचं संरक्षण – कोणते विचार स्वीकारायचे आणि कोणते टाळायचे? जसे घराचं संरक्षण करतो आपण – कुलूप लावतो, काच बंद करतो, बाहेरचं धोकादायक आत येऊ नये यासाठी काळजी घेतो... पण आपल्या मनाचं संरक्षण करतो का? सतत बाहेरून येणारे विचार, मतं, तुलना, टीका, भीती यांचा मारा होत असतो. यातलं काय स्वीकारायचं आणि काय नाकारायचं हेच ठरवणं महत्वाचं. हीच खरी मानसिक सुरक्षा! 1. मन एक शेतीसारखं आहे – जे विचार पेराल, तेच उगम पावतील – नकारात्मक, निराशाजनक, अपमानजनक विचार पेरले, तर मन थकलं-हरलं वाटेल – सकारात्मक, प्रेरणादायी, आशावादी विचार पेरले, तर मन उभं राहतं. Mindsetmatters, कारण मनात जे टाकता अथवा स्विकारता, तेच तुमच्या कृतीत उतरते. 2. कोणते विचार स्वीकारायचे? – जे तुमच्या ध्येयाशी जुळतात – जे तुम्हाला योग्य निर्णय घ्यायला मदत करतात – जे तुमचा आत्मविश्वास वाढवतात – जे तुमचं मन सुसंगत ठेवतात 3. कोणते विचार टाळायचे? – “आपल्याला जमणार नाही” – “तो बघ कसा पुढे गेला, आपण कुठं आहोत?” – “लोक काय म्हणतील?” – “माझं नशीबच खराब आहे” Mindsetiseverything – कारण विचार जर तुमच्या सोबत नाहीत, यशाच्या वाट...

"कौशल्याधारित करिअर – शिक्षणापेक्षा कौशल्य जास्त का महत्त्वाचं?"

#करिअर_मार्गदर्शन – भाग 6 "कौशल्याधारित करिअर – शिक्षणापेक्षा कौशल्य जास्त का महत्त्वाचं?" आजचं जग डिग्रीवर नाही तर स्किलवर चालतंय. कितीही चांगली डिग्री असली तरी जर तुमच्यात काम करण्याचं कौशल्य नसेल, तर ती डिग्री उपयोगाची ठरत नाही. याउलट, कमी शैक्षणिक पात्रता असलेल्या व्यक्तीलाही योग्य कौशल्य असल्यास यशस्वी होणं सहज शक्य आहे. शिक्षण VS कौशल्य – फरक काय? शिक्षण (Education) कौशल्य (Skill) किताबी ज्ञान vs प्रत्यक्ष कृतीतले ज्ञान... शिकून सर्टिफिकेट मिळतं पण कृतीने काम मिळतं. सिद्धांत शिकवतो पण प्रत्यक्ष कृती अनुभव देते. यश सर्वांनाच मिळू शकते. सराव आणि मेहनतीनं करिअर घडतं... कौशल्याचे महत्त्व का वाढलंय? 1. उद्योगांना काम करणारे लोक हवे असतात – डिग्रीवालं नव्हे. 2. नवीन व्यवसायात कौशल्यांची गरज मोठी आहे – उदाहरणार्थ: डिजिटल मार्केटिंग, फोटोग्राफी, टेक्निकल सर्व्हिसेस. 3. कौशल्याच्या आधारे आत्मनिर्भरता येते – स्वतःचं काम करता येतं. विद्यार्थ्यांनी कोणती कौशल्यं शिकावीत? डिजिटल कौशल्ये: MS Office, Canva, Social Media Handling तांत्रिक कौशल्ये: इलेक्ट्रिक, प्लंबिंग, रिपेअरिंग, म...

कोकणातील प्रत्येक गावात 2-3 गाईड तयार झाले पाहिजेत...

प्रत्येक गावात 2-3 गाईड तयार झाले, तर कोकणातील पर्यटन अधिक आकर्षक, माहितीपूर्ण... #MKS_Tourism भाग 12 कोकणातील पर्यटनासाठी स्थानिक गाईड तयार करणे – का आवश्यक आहे? पर्यटक जेव्हा नव्या ठिकाणी येतात, तेव्हा त्यांना फक्त सुंदर दृश्यं नाही, तर त्या जागेची कथा, संस्कृती, आणि अनुभव जाणून घ्यायची उत्सुकता असते. ही गरज पूर्ण करतो एक व्यक्ती – स्थानिक गाईड. कोकणातील प्रत्येक गाव, वाडी, मंदिर, किल्ला, धबधबा, समुद्रकिनारा यामागे एक गोष्ट आहे आणि ती गोष्ट सांगणारे ‘गाईड’ तयार करणं, हे कोकण पर्यटनाच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक पाऊल आहे. स्थानिक गाईडची गरज का आहे? पर्यटकांशी थेट संवाद परिसराचं माहितीपूर्ण सादरीकरण स्थानिक संस्कृतीची ओळख गोंधळ, फसवणूक, दिशाभूल टाळणे विशेष अनुभव देणे (कथा, लोकसाहित्य, जुने संदर्भ) गाईड ही संधी कशा प्रकारे आहे? तरुणांसाठी रोजगार भाषा कौशल्य वाढवण्याची संधी ग्रामीण भागात करिअरची नवीन दिशा दररोज कमाई (500 ते 2000 रु पर्यंत) पर्यटन क्षेत्राशी थेट जोड गाईड तयार करण्यासाठी गरज – 1. स्थानिक माहितीचे प्रशिक्षण 2. मराठी, हिंदी, इंग्रजी बोलण्याचं सराव 3. वेशभूषा, शिस्त, स्वागतशै...

आपल्या आयुष्याला कोण जबाबदार?"

"आपल्या आयुष्याला कोण जबाबदार?" तुम्हाला कधी प्रश्न पडतो का?  “माझं आयुष्य असंच का आहे?” “संधी मिळत नाहीत… समाज समजून घेत नाही… नशीब साथ देत नाही…” पण खरंच विचार केला तर एक गोष्ट स्पष्ट होते – ती म्हणजे आपल्या आयुष्याची घडणं ही फक्त आणि फक्त आपल्यावर अवलंबून आहे. 1. आपला हेतू – (Intention) तुम्ही आयुष्याकडे कोणत्या भावनेनं बघता? हे फक्त जगणं आहे की काहीतरी घडवण्याची संधी? हेच ठरवतं – तुम्ही किती खोलवर आणि किती प्रामाणिकपणे जगता. 2. आपले विचार व दृष्टीकोन – (Mindset & Vision) तुमच्या आजच्या स्थितीपेक्षा तुमचा विचार तुम्हाला किती पुढं घेऊन जाऊ शकतो, हे महत्त्वाचं. नकारात्मकता टाकून आशावादी आणि कृतीशील विचार ठेवा. कारण तुमचा दृष्टीकोनच तुमचं वर्तन ठरवतो. 3. आपली कृती – (Action) विचार कितीही छान असले, तरी कृती नसेल तर आयुष्य बदलत नाही. दररोज घेतलेलं एक छोटं पाऊलही तुम्हाला तुमच्या स्वप्नाजवळ घेऊन जातं. कर्तृत्वच आयुष्य बदलतं – तक्रारी नव्हे. तर उत्तर स्पष्ट आहे – "आपल्या आयुष्याला जबाबदार कोण?" उत्तर – मी स्वतः! – माझा हेतू – माझे विचार – माझी कृती "नशीबाचं लिह...

मनाला जड नको, हलकं ठेवा!

मनाला जड नको, हलकं ठेवा! प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेतली, तर मन शांत कसं राहील? लहानसहान गोष्टी मनाला लावून घेणं हे आपल्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करतं. लोक काय म्हणतात, कोण काय करतो, याचं जर आपण सतत मनावर ताण घेत राहिलो, तर आयुष्य तणावातच निघून जाईल. परिपक्व माणूस मात्र समजून घेतो की सगळ्या गोष्टींना महत्त्व द्यायचं नसतं. काही गोष्टींवर दुर्लक्ष केलं की मन जास्त शांत राहतं आणि जीवनाचा आनंद घेता येतो. समस्या – लोक सहज मनाला का लावून घेतात? १. इतरांच्या मतांचा प्रभाव – लोक काय म्हणतील? हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. जरी ती टीका चुकीची असली तरी मनाला लागते. २. अपेक्षा पूर्ण न झाल्यास दुःख – आपण दुसऱ्यांकडून एखाद्या वागणुकीची अपेक्षा करतो आणि जर तसं घडलं नाही, तर मन दुखावतं. ३. नकारात्मकतेचा प्रभाव – आजूबाजूच्या वातावरणातून आपल्यावर नकारात्मक ऊर्जा येते. कुणीतरी काही बोलून गेलं, तिरस्कार दाखवला, दुर्लक्ष केलं, की आपण ते मनाला लावून घेतो. ४. भूतकाळातील अनुभव – आधी कोणी वाईट वागलं असेल किंवा धोका दिला असेल, तर भविष्यातही प्रत्येक गोष्ट त्याच दृष्टीने पाहण्याची सवय लागते. खरं कारण – प्र...

मिशन कोकण साम्राज्य

नाव: मिशन कोकण साम्राज्य विषय: कोकणच्या सामर्थ्यांची ओळख कोकण म्हणजे संधींचं उगमस्थान, पण त्याची जाणीव आपल्यालाच नाही! कोकणाकडे पाहताना आपल्याला झाडं, डोंगर, समुद्र, नारळ, आंबा, मासे आणि पर्यटन दिसतं. पण खरं पाहिलं तर या सर्व गोष्टींमागे एक अफाट "सामर्थ्य" दडलेलं आहे जे रोजगार, उद्योजकता आणि प्रगती घडवू शकतं, पण आजही त्याचा पुरेपूर उपयोग होत नाही. कोकणची खरी ताकद कोणती? 1. निसर्गसंपन्नता – सह्याद्रीच्या कुशीत वसलेली ही भूमी भरपूर पावसामुळे शेतीसाठी योग्य आहे. – जलस्रोत, जैवविविधता आणि पर्यावरणीय शुद्धता ही इथली नैसर्गिक देणगी आहे. 2. उत्कृष्ट कृषी उत्पादने – हापूस आंबा, काजू, नारळ, पोफळी, कोकम, भात यांची देशात आणि परदेशातही मोठी मागणी आहे. – जैविक शेती आणि नैसर्गिक प्रक्रियांसाठी कोकण सर्वात योग्य आहे. 3. पर्यटनाची अफाट शक्यता – समुद्रकिनारे, किल्ले, जलप्रपात, घाटमार्ग – येथील पर्यटन हे वर्षभर सुरू ठेवण्यासारखं आहे. – ग्रामीण पर्यटन, होमस्टे, अ‍ॅग्रो टुरिझमची नवी दिशा निर्माण करता येते. 4. संपन्न सांस्कृतिक परंपरा – दशावतार, कोकणी भाषा, लोककला, खाद्यसंस्कृती हे सर्व जगात आकर्...